महाराष्ट्रात 10 मे पासून नवीन वाळू धोरण लागू केले गेले आ असून आता प्रत्येकाला फक्त 600 रुपयांमध्ये एक ब्रास वाळूची होम डिलिव्हरी केली जाणार आहे.
वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी गुंडगिरी हटविण्याचे काम या धोरण अंवलब केला आहे. नगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय वाळू डेपोचे उद्घाटन केला गेला.
महसूलमंत्री विखे-पाटील यांच्या निर्धाराने महाराष्ट्र दिवस 1 मे पासून नवीन वाळू धोरण सुरू केले आहे.
1 – ग्राहकांना किमान 600 रुपयांना ब्रास वाळू मिळेल.
2 – घरबसल्या ऑनलाइन नोंदणी करू शकणार आहेत.
3 – डेपोतून घरपोच वाळू मिळेल.
4 – वाहतूक फक्त ट्रॅक्टर व ट्रकद्वारे केली जाईल.
5 – नदी मधून फक्त मजुरा कडून उपसा केला जाणर.
6 – सामाजिक सुरक्षा व ग्रामीण भागामधील लोकांचे जीवन सुरक्षित राहील. बेकायदेशीर वाळूचा ऊपसा केल्यावर मोक्का कायद्याअंतर्गत करवाई
7 – जेसीबी व पोकलेनला बंदी असणार आहे.
8 – अवैध वाळू उपशाला लगाम बसणार आहे.
9 – आरटीओ मान्यताप्राप्त वाहनाचा वाळू वाहतूक परवाना.
10 – वाळूत घट होणार असल्याने ग्राहकांचा बांधकाम खर्च कमी होणार आहे
