लग्नसोहळा आटपून महिला अँपेरिक्षातून येत असताना घडल अस काही…

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील वरंवडी येथील रेश्मा नानासाहेब पोपळघट (वय 27) या महिलेचा नेवासे तालुक्यातुन परतत असतांना झालेल्या विचित्र अपघातात (Accident) दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वरंवडी येथिल नानासाहेब पोपळघट व रेश्मा पोपळघट हे दाम्पत्य कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. रविवारी नेवासे तालुक्यात आप्तेष्टाचे लग्न होते. त्यामुळे हे दापत्य लग्नासाठी आले होते.

रविवारी लग्नसोहळा आटपून अँपेरिक्षाने खडका-सलाबतपूर रस्त्यावरुन येत असताना हॉटेल वैभव समोर ही अँपेरिक्षा पलटी झाली. त्यामुळे रिक्षात बसलेल्या रेश्मा या डोक्यावर पडल्यामुळे जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.

तर त्याच्या समवेत असलेले पती व आई तसेच वडील यांना मुक्कामार लागल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment