अहमदनगर – श्रीरामपूर येथील बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या कांदा लिलावात ५ हजार रुपये क्विंटल (५० रुपये किलो) प्रमाणे उच्चांकी दर मिळाले.
बुधवारी बाजार समितीत ६ हजार ८२० कांदा गोण्यांची आवक झाली. यात चांगल्या प्रतीच्या मालाला ५ हजार रुपये क्विंटल दर मिळाला.
दुय्यम प्रतीचा माल ३५०० रुपये तर हलक्या दर्जाचा माल २००० रुपये क्विंटल दराने विक्री झाला. गोल्टी कांद्याला ३६०० रुपये दर मिळाले
