बापरे! रात्र झाल्याने पती – पत्नीने प्रवास थांबवला आणि छतावर झोपायला गेले पण सकाळ होताच…..

आपल्या पत्नीला उपचारासाठी घेऊन एक व्यक्ती घरातून निघाला. हॉस्पिटल दूर असल्याने त्यांना पोहोचण्यासाठी उशीर झाला. मग त्यांनी एका ओळखीच्यांकडे आश्रय घेण्याचा निर्णय घेतला आणि हे पती-पत्नी रात्री झोपण्यासाठी त्यांच्या घराच्या छतावर पोहोचले. त्यानंतर सकाळी असे काही घडले की ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

 

नेमकं काय आहे प्रकरण?

ही घटना बिहारमधील गया येथील आहे. रामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा मोहन यादव आपल्या पत्नीला उपचारासाठी घेऊन निघाला होता. मात्र, रात्र झाल्याने त्या व्यक्तीने आपल्या जुन्या मालकाच्या घरी थांबण्याचा निर्णय घेतला आणि तो पत्नीला घेऊन त्यांच्या घरी गेला. रात्री पती आणि पत्नी हे दोघेही (मंगळवार, 12 सप्टेंबर) त्यांच्या छतावर झोपण्यासाठी गेले.

त्यानंतर सकाळी जेव्हा घर मालक हे छतावर पोहोचले तेव्हा ती महिला मृतावस्थेत आढळून आली. महिलेचा गळा कापून तिची हत्या करण्यात आली होती. हे दृष्य पाहून त्यांना एक मोठा धक्का बसला. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला. तसेच आपला तपास सुरू केला.

या घटनेनंतर मोहन हा फरार झाला होता त्यामुळे त्याच्यावरच पोलिसांचा संशय बळावला आहे. मृतक महिलेचे वय अंदाजे 30 ते 32 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. मोहन याने आपल्या पत्नीची हत्या का केली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. या प्रकरणी पोलीस आरोपी मोहन यादव याचा शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.

Leave a Comment