काळजी घ्या! राज्यात पुढील तीन महिने थंडीचे…

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन महिने राज्यासह देशातही थंडीसाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे. 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरचा काळ हा बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी पूरक मानला जातो, पुढे डिसेंबरमध्ये मात्र वादळाची ही शक्यता कमी होते. परिणामी कमी दाबाच्या पट्ट्यामुळं तापमानात घट होण्याची शक्यता तुलनेनं कमीच आहे.

हिमालय आणि उपहिमालय क्षेत्रामध्ये पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळे राज्यासह देशातून थंडी इतक्यात काढता पाय घेण्याची शक्यता कमीच असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय या क्षेत्रांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं होणारी बर्फवृष्टी पाहता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत थंडी पाठ सोडणार नाही असंच चित्र आहे. फक्त देशातच नव्हे तर राज्यात यंदा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment