महाराष्ट्रात पावसाचा काय आहे अंदाज, जाणून घ्या 

राज्यात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी ?

राज्यात 19 मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे . तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, लातूर, धाराशीव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात आज यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

इथे ताशी 40 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. इथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील चार दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. महाराष्ट्रातील कमाल तापमानात  सध्या कोणतीही वाढ होणार नाही.

किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इथे 60- किमी वेगाने वारे वाहतील. पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

Leave a Comment