मोठी बातमी! उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर हल्ला 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे.

लखीसराय येथे मतदानादरम्यान गोंधळ उडाला, त्यादरम्यान विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. विजय सिन्हा यांनी या घटनेसाठी राजदला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की राजदच्या गुंडांनी हा हल्ला केला आहे. “ते सत्तेत आलेच नाहीत आणि गुंडगिरी सुरू झाली आहे,” असे ते म्हणाले.

ही घटना लखीसराय येथील खोरियारी गावात घडली. आरजेडी समर्थकांनी उपमुख्यमंत्र्यांची गाडी पुढे जाण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. मतदानाच्या दिवशी विजय कुमार सिन्हा खोरियारी गावात पोहोचले तेव्हा आरजेडी समर्थकांनी सिन्हा यांच्या गाडीला घेरले. त्यांच्या ताफ्यावर चप्पल, दगडफेक करण्यात आली आणि “मुर्दाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या

Leave a Comment