मोठी बातमी! अहमदनगरमधील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर

राज्यात मराठा आरक्षण तीव्र झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखली आंदोलन सुरू आहे. त्यानुसार, राज्यात शांतता रॅलीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे. ही रॅली 12 ऑगस्ट रोजी अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे. या रॅलीला मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता अहमदनगरच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देत तातडीने सगेसोयरेंची अधिसूचना जारी करावी. तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून या रॅलीची सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या या शांतता रॅलीला मोठा प्रतिसाद लाभत असून लाखो मराठा बांधव या रॅलीत सहभागी होत आहे.

मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सांगलीहून कोल्हापूरमध्ये पोहोचली असता या ठिकाणी रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान, जरांगे पाटील यांनी दसरा चौकामध्ये शाहू महाराज यांना अभिवादन केले. त्यानंतर आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. दरम्यान, शिवाजी चौकामध्ये झालेल्या जाहीर सभेत जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तसेच कोल्हापूरच्या स्थानिक मुद्यांवरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी मनोज जरांगे पाटील सरकारला इशारा देत, सरकारला अजूनही आम्ही गोडीने आरक्षण मागत आहोत. आता विनंती करून सांगत आहे, मात्र शेवटचा पर्याय म्हणून विधानसभेला सगळे उमेदवार पाडावे लागतील.

मराठा आरक्षण आंदोलनाची शांतता रॅली 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वीतील या रॅलीच्या पार्श्वभूमीवर संभव्य गर्दी लक्षात घेता अहमदनगर जिल्हा प्राशासनातर्फे अहमदनगर शहरासह उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रॅलीमुळे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षाल घेता हा निर्णय घेत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, सुट्टीच्या दिवसाच्या तासिका इतर दिवशी भरून काढवीत, असेही आदेशात म्हटले आहे.

Leave a Comment