प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या पावसाने बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात सर्व दूर हजेरी लावली, शहरात संततधार सुरू होती.
त्यामुळे जिल्ह्यात दोन दिवस यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच पावसामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
पावसामुळे प्रवरा, गोदावरी व भीमा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे
