भारतात आता ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारत (आरोग्य विमा योजना) अंतर्गत कव्हर मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही माहिती दिली. कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान त्यांनी सांगितले की, ७० वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील.
याचा सहा कोटी ज्येष्ठ नागरिक आणि 4.5 कोटी कुटुंबांना फायदा होईल. या योजनेंत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांचे अतिरिक्त कव्हरेज दिले जाईल.
केंद्रा सरकारच्या या निर्णयानंतर 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता, AB PM-JAY चे लाभ दिले जातील. पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन अद्वितीय कार्ड जारी केले जाईल. AB PM-JAY अंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांतील 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःसाठी वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळेल.
केंद्रीय मंत्रिमंडळात 6 मोठे निर्णय घेण्यात आले. आयुष्मान भारत अंतर्गत ७० किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कव्हरेज दिले जाईल.
