तर उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे सोडून गेले नसते

“उद्धव ठाकरे यांचं आता उफाळलेलं प्रेम आधी उफाळले असते, तर एकनाथ शिंदे सोडून गेले नसते”, असा खोचक टोला भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्या देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अनेक बैठका पार पडत आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच बैठकीनंतर प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

“आतापर्यंत ड्रमगेट ते मेनगेट आणि मेनगेट तू ड्रमगेटच्या बाहेर उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात ते फक्त तीन वेळा गेले. फेसबुक लाईव्हवर त्यांनी सरकार चालवलं. आता उफाळलेलं प्रेम आधी उफाळले असते तर एकनाथ शिंदे सोडून गेले नसते. सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वाईट वागणूक दिली. म्हणून हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आमदार बाहेर पडले. आता उरलेले आमदार बाहेर पडतील म्हणून हा केविलवाणा प्रयत्न आहे”, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी टीका केली.

Leave a Comment