Good News! मान्सून अरबी समुद्रात दाखल, महाराष्ट्रात “या” दिवशी येणार 

देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर अंदमानात दाखल झाला असून तो अरबी समुद्रात पोहोचला आहे. अरबी समुद्रासह मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मान्सून 27 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, तर महाराष्ट्रात 7 जूनपर्यंत त्याचे आगमन होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुढील 4 ते 5 दिवसांत मुसळधार पाऊस

पुढील 4 ते 5 दिवसांत मध्यम ते तीव्र मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मेघगर्जनेच्या वेळी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, झाडांचा आश्रय घेऊ नये आणि सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह (40-50 किमी प्रतितास वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment