शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर) लागणार आहे. त्याआधी एक्झिट पोल आणि नेत्यांच्या अंदाजांचा टप्पा सुरू आहे. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांचा पराभव होऊ शकतो, असा दावा शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी केला आहे.

अजित पवारांना आपली जागा वाचवणेही कठीण जाईल, असे ते गुरुवारी म्हणाले. जानकर म्हणाले, अजित पवार 40 हजारांहून अधिक मतांनी पराभूत होऊ शकतात. एकप्रकारे त्यांना मिळणारे प्रत्येक मत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यात जाणार आहे. बारामती विधानसभा सोपी होणार नाही. युगेंद्र पवार यांचा विजय निश्चित आहे, असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केले. याचदरम्यान एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार पवार काका-पुतणे एकत्र आले तर दोघांची मिळून फार मोठी ताकद तर निर्माण होईलच, पण त्यांच्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्य होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

दरम्यान, पवार कुटूंबांनी ठरल्यास राज्यातील सत्तेच्या चाव्या हाता येऊ शकतात. अशा परिस्थितीत काका शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार एकत्र येणार की नाही,असा अनेक तर्क वितर्काना निवडणूक प्रचारादरम्यान उधाण आलं होतं. त्यांच्या शक्यतेचे संकेतही या एक्झिट पोलमधून मिळत होते. जर ते एकत्रित आले तर राज्यात सत्ता स्थापन करु शकतात.

तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. या सरकारला बहुमत असेल. यापूर्वी काटेवाडीत अजित पवार यांनी राज्यात महायुतीचे सरकार येणार असून 175 जागा मिळतील असा दावा केला होता. त्यावर शरद पवार म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही जो नेमकी जागा किती आहे हे सांगू शकेल. पण अजित पवारांचा आकडा लक्षात घेता त्यांनी केवळ 175 आणि 280 जागांवर दावा करायला हवा होता.

Leave a Comment