महाराष्ट्रात पुढील पाच दिवस तुफान गारपिटीचा अलर्ट, “या” जिल्ह्यांना…. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं लहरी हवामान थांबण्याचं नाव घेत नाहीये. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. विशेषतः ३० आणि ३१ मार्च रोजी पावसाचा जोर अधिक राहणार असून, काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू शकतात.

३० आणि ३१ मार्च रोजी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा घाटमाथा परिसर सांगली आणि सोलापूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि काही भागांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Leave a Comment