अहमदनगर : अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभारलं गेलं आहे. या मंदिराचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही, असे असतांना मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यास अनेकांनी विरोध केला आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अर्धवट आहे ते पूर्ण होण्यास आणखी तीन वर्षे लागणार आहेत परंतु निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उठवण्यासाठी अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई भाजपाला झाली असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचं महाराष्ट्रातील दिग्गजांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एका गावाच्या सरपंचाला कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपनेचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.
