संगमनेर(DSNews24 ) महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू(रा.अध्यक्ष, प्रहार जनशक्ती) यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, हमीभाव, विधवा तसेच दिव्यांग बांधवांना मासिक ६,०००/- अशा विवीध मागण्यांसाठी दिनांक २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या चक्काजाम आंदोलनाला शिवप्रतिष्ठाननेही पाठिंबा देत सहभाग घेतला होता.
संगमनेर बस स्थानकासमोर पुणे-नाशिक हायवेवर शिवप्रतिष्ठानने चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी अगदी हायवेच्या मध्यातच पत्त्याचा खेळ सुरु करत एक प्रकारे कृषिमंत्र्यांनाच लक्ष केले. यावेळी उपस्थितांच्या भावना अतिशय तीव्र स्वरुपाच्या होत्या. यामध्ये शेतकरी तसेच दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. आंदोलनकर्त्यांच्या वतीने प्रहारचे संगमनेर तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात, शिप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील, विनायक दाभोळकर(दिव्यांग सारथी संघटना) यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, प्रशासनाला निवेदन दिले.
यावेळी युवानेते अभिजीत दिघे, गणेश शेळके, निलेश थोरात चेअरमन, उपाध्यक्ष दिव्यांग संघटना संभाजी काळे, जालिंदर जाधव, शिवप्रतिष्ठाणचे राज्य संघटक हौशीराम मिंडे, अहिल्यानगर जिल्हा संघटक शिवनाथ नाईकवाडी, संगमनेर तालुकाध्यक्ष गणेश श्रीराम, तालुका उपाध्यक्ष जालिंदर गुळवे, तालुका संघटक तुषार ढेंबरे, सामाजिक कार्यकर्ते भिमाजी दिवटे, प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प.शिवाजी महाराज दाते, प्रशांत थोरात, अरुण कुलधरण, अवधूत पोखरकर, बाळासाहेब गायकवाड, संदीप कुटे, अनिता फटांगरे, सुभाष साबळे, अशोक निळे, मीराबाई पिंगट, शिवनाथ घुले, अर्चना गवंडी, प्रमिला पडवळ, मंगल खतोडे, शिवनाथ घुले, वनिता उपाध्ये, अनिता फटांगरे, राणू फटांगरे, बाबुराव नागरे, संजय भालेराव, पांडुरंग कासार, विजू नवले, अन्सार सय्यद, सुरज येवले, अविनाश गायकवाड, गणेश कणसे, सागर एरंडे, ओम वाकचौरे, संजय बोंबले, सोमनाथ आव्हाड(संगमनेर तालुका मातंग समाज), संतोष रणशूर आदींसह तालुक्यातील शेतकरी/दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
