राज्यातील २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, संगमनेर कनेक्शन…..

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आरक्षणाची सोडतही जाहीर झाली आहे. दुसरीकडे शासनाकडून IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी आज दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बैठकीनंतर काल सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून राज्यात प्रशासकीय वर्तुळात खांदेपालट पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेली अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा सुरुच असल्याचं दिसत आहे.

कुणाची कुठे बदली?

1) पुण्याचे साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची मुंबईत कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धराम सालीमठ हे २०११ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

2) कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास मारुती पानसरे यांची बदली करून त्यांची नियुक्ती मुंबईत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. विकास पानसरे हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

 

कोण आहेत सिद्धराम सालीमठ?

सिद्धराम सालीमठ हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सालीमठ यांनी राहुरीच्या कृषी विद्यापीठातून एमएससी पदवी प्राप्त केली.

 

कोण आहेत विकास पानसरे?

विकास पानसरे हे २०१४ सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे संगमनेर येथील आहेत. त्यांनी अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचं प्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे.

Leave a Comment